जेव्हा मी मोदीला अँटी सायन्स,अँटी मॉडर्न सरकार म्हणालो तेव्हा ते अनेकांना आवडलं नाही.पण माझं म्हणणं बरोबर आहे हे मोदी सरकारच कृतीतून वारंवार सिद्ध करतंय.
आता मोदी सरकारच्या सायन्स मंत्रालयाने कोरोनावर गायत्री मंत्र पठणाचा काय परिणाम होतो ह्यावर संशोधनासाठी फंड द्यायचं ठरवलं आहे.
हा मूर्खपणाचा कळस आहे.

एकीकडे ह्या सरकारकडे देशातल्या सर्व नागरिकांना मोफत लस द्यायला पैसे नाहीत. ऑक्सिजन वेळेवर मिळत नाहीये. व्हेंटिलेटर्स आणि बेड मिळत नाहीयेत. आणि सरकारला काय सुचतंय? गायत्री मंत्रावर संशोधन.
मी आज तुम्हांला सांगतो. हे ह्या मोदी सरकारला पण माहिती आहे की ही असली संशोधनं काहीही कामाची नाही.पण तरीही ते हे करत आहेत. का? कारण त्यांना लोकांना मूर्ख आणि धर्मांध बनवायचे आहे. गायत्री मंत्र ही सूर्याची प्रार्थना आहे. ती घराघरात म्हटली जाते. पण
लोकांमध्ये ह्या मंत्रामुळे कोरोना बरा होऊ शकतो असा संभ्रम पसरवला जातोय. का?

तर हे सरकार हिंदूंच्या प्रतिकांसाठी किती मेहनत घेतेय हे दाखवणं आणि त्यातून अवैज्ञानिक हिंदुत्ववाद पसरवणे सुरू आहे. हे केलं तरच लोकं त्यांना मतं देत राहतील.
ह्यांना लोकांच्या - त्यात हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, शीख सगळ्या धर्माचे लोक आले - ह्या लोकांच्या प्रकृतीची, आरोग्याची काळजी नाही. ह्यांना फक्त मतांची काळजी आहे. आरोग्याची काळजी असती तर हे असं वागले नसते.

म्हणून सांगतो.
ह्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाने देशाचं आधीच नुकसान केलंय. आता तरी हे ओळखा आणि ह्यांच्या ह्या गलिच्छ राजकारणाला नाकारा.
You can follow @VishalShinde_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: