गेले १५ दिवस झाले सोशलमिडीया असो, टिव्ही, पेपर वा घरातली चर्चा असो कोरोनामुळे वेड लागायची पाळी आलीये इतक्या विचित्र थराला जाऊन पोहचलीये.

सरकारी अनागोंदी, राजकारणातील कुरघोडीच्या विकृती, कपटी राजकारणी,

#SaturdayThread #CoronaPandemic #CoronaSecondWave #मराठी
१/१२
त्यांना साथ देणारे नकली पत्रकार, सुट्टीवरील न्यायव्यवस्था आणि नाकर्ते प्रशासन याला जेवढे कारणीभूत आहेत तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त आपली “बेशिस्त” जनता याला कारणीभूत आहे. (या प्रत्येकात अगदी काही अपवाद आहेत, त्यांची मी क्षमा मागतो)

पण वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक
२/१२
क्षेत्रात, ऊद्योग असो, खाजगी वा सरकारी नोकरी असो वा घरगुती वा लघु ऊद्योग असो आपल्याला नियम आणि कायदे वाकवायची, मोडायची भितीच वाटत नाही, आणिबाणीच्या, महामारीच्या काळातही कोणी कायद्याला किंमत देईना.

एकंदर अघळपघळपणा आणि “चलता है” ॲटिट्यूड आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलाय.
३/१२
पत्रकार, पोलिस आणि न्यायव्यवस्था ही याच मुळे तर भ्रष्ट होत चाललीये.

आजच्या एकविसाव्या शतकातही आपल्या देशाचा विज्ञानापेक्षा इतिहास आणि इतर नको त्या गोष्टींवरचा विश्वास दृढ होत चाललाय. तार्कीक आणि सांख्यिकीचे गणित जाणणारे जगभरातील तत्वज्ञ, आरोग्यविषयक शास्त्रज्ञ महामारीच्या
४/१२
दुसऱ्या लाटेबद्दल बोलत असताना आपल्याकडे ॲाक्टोबरपासूनच सर्व सूरळीत झाल्याच्या थाटात कार्यक्रम सुरू झाले.

सर्वात मोठा विनोद म्हणजे यात राजकारण्यापेक्षा शिकले सवरले लोक बेफाम होऊन सगळीकडे सहकुटुंब फिरत होते. मग यात बिनडोक राजकारणी कसे मागे राहतील तेही हिरहिरीने सामिल झाले.
५/१२
लस, औषधे, आरोग्य व्यवस्थेची उभारणी, डॅाक्टर, नर्सेस, इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, सोईसुविधा सर्वांचा विसर पडला. आणि वर्षभरानंतर एका भयंकर दुस्वप्नाच्या आगडोंबात हा देश बुडाला.

माझ्या मते कोरोना रोगापेक्षा पेक्षा जास्त बळी हे आपली एकंदर व्यवस्था गहाळ राहिल्याने, दुसऱ्या लाटेची
६/१२
कोणतीही पुर्वतयारी न केल्याने आणि नियोजनशुन्य कारभारामुळे पडलेत. सर्वाधिक निरपराध जीवांच्या मृत्यूचे कारण हे ही अव्यवस्थेतच आहे.

निवडणुका, लग्नसमांरभ, जत्रा, विविध कार्यक्रम यातील बेशिस्त आणि कायदे मोडण्याच्या उपजत स्वभावामुळेही कित्येक निरपराध, निष्पांपांचा यात जीव गेलाय.
७/१२
या कोरोना व्हायरसपेक्षा आपल्यातील हे दुर्गुण आपल्या देशाला, राज्याला आणि कुटुंबाला जास्त धोकादायक आहेत...

जगभरातील शास्त्रज्ञ ओरडून सांगत असताना आपले देश अन राज्य पातळीवरील सर्वोच्च नेतेच जर विना मास्कचे फिरत असतील तर आपली जनता कशाला कायदे मानेल?

या भयंकर महामारीतून
८/१२
आपल्या देशाला आणि राज्याला काय शिकायचे असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे, स्वत:ची आणि कुटूंबाची सुरक्षा आणि कामाची शिस्तबद्ध पद्धत!

मला वैयक्तिकरित्या वाटते की ही महामारी सरकार पेक्षा आपण सर्वांनी मिळून ओढवून घेतलीये.... खर तर
९/१२
हे एक कटू सत्य आहे की - “We are getting what we all deserve!”

लायकीप्रमाणे हा कोरोना आपल्या देशाला छळतोय. मंडळी, आपण स्वत:च आपल्यासोबत इतर सर्वांनाच स्मशानाकडे ढकलतोय....

निदान आता तरी जागे होऊ, शिस्त, कायदे, नियम पाळू.... इतरांनाही ते पाळायला लावू....
१०/१२
कोरोनाला टाळण्याचा सध्या तरी दुसरा कोणताच उपाय नाही.

चला, मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, लवकरात लवकर लस घेण्यासाठी प्रयत्न करा, राजकारणी काहीही म्हणो, जात, धर्म, विसरून एकमेकांना मदत करा!
११/१२
स्वत:ची आणि कुटूंबाची काळजी घ्या, सुरक्षित रहा!

धन्यवाद 🙏
१२/१२
#SaturdayThread #CovidPandemic #मराठी
You can follow @wankhedeprafull.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: