लेण्यातील अस्थी रक्षा आणि त्यातिल अस्थी करंडक....!

तथागत गौतम बुद्ध यांच्या शरिर धातूंना आठ भागात विभाजित करून त्यावर आठ स्तूप बांधण्यात आले होते हे सारे स्तूप मैदानी भागात होते.नंतरच्या काळात म्हणजे इ स पुर्व तिसर्‍या शतकात चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कारकीर्दीत आठ पैकी
1)
सात स्तूप उघडले गेले होते व त्यातील तथागतांच्या अस्थी रक्षा महाराष्ट्रात आल्याच्या नोंदी आहेत. सोपारा, कान्हेरी, तेर (तगर ) कोल्हापूर आणि पवनी ही ती ठिकाणे होती, आज मात्र हे स्तूप नाहीसे झाले आहेत किंवा शेवटचा श्वास घेत आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या बाहेर आपण मैदानी
2)
भागात अस्थी रक्षेवर स्तूप बांधल्याचे पाहतो तसे स्तूप आपल्याला महाराष्ट्र पाहायला मिळत नाही अपवाद वगळता वरील नमूद केलेले स्तूप.
मैदानी जागेत स्तूप बांधण्या ऐवजी लेणीत प्रमुख भिख्खू व त्यांचे शिष्य यांच्या अस्थी रक्षा ठेवण्याची पद्धत अवलंबली जात होती.
3)
The Rock-cut Caves Of Pitalkhora In The Deccan या M N Deshpande सरांच्या रिपोर्ट मध्ये पितळखोरा लेणीवर काही मौल्यवान अवशेष मिळालेच्या नोंदी आहेत.

१) पितळखोरा ही लेणी सुरूवातीच्या खोदण्यात आलेल्या लेण्यांच्या पैकी एक लेणी आहे मराठवाड्यातील ही सर्वात प्राचीन लेणी, १८५३
4)
मध्ये John Wilson यांनी या लेण्या पहिल्यांदा उजेडात आणल्या त्या नंतर १८८० मध्ये James Burgess यांनी ,पण खरे काम झाले ते १९५०/५३ मध्ये.
M N Deshpande आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्यांनी तीन नंबरच्या चैत्यगृहातून काही पायर्‍या खाली उतरतात अशा खूणा सापडल्या आणि त्यांनी चार
5)
नंबरच्या विहाराकडे जाणार रस्ता साफ करून या मौल्यवान अवशेष बाहेर काढले या उत्खननातून त्याना अनेक शिल्प तसेच महामायेचे स्वप्न शिल्प संकरिन यक्ष आणि महत्त्वाचे म्हणजे "स्फटिकाचे स्तूपाच्या आकाराचे रक्षा पात्र" .
पितळखोरा लेणीत मिळाले भारतात ही एकमेव लेणी जिथे "स्फटिकात बनवलेले
6)
स्तूपाच्या आकाराचे रक्षा पात्र" सापडले आहे. ७ फेब्रुवारी १८८२ साली पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी सोपारा स्तूपाचे उत्खनन केले होते त्यात त्यांना बर्‍याच मौल्यवान अवशेष मिळाले होते त्यात स्फटिकाचे छोटे गोल पात्र मिळाले होते ज्यात तथागतांच्या मातीच्या भिक्षा पात्राचे
7)
तेरा तुकडे होते पण पितळखोरा लेणीतील स्तूपाच्या आकाराचे रक्षा पात्र हे एकमेव उदाहरण आहे.
पितळखोरा लेणीच्या भागात सात स्फटिक अवशेष मिळाले होते त्याची नोंद M N Deshpande सरांनी केलेली आहे ती खालील प्रमाणे.

"In all seven crystal objects, six of them reliquaries and the
8)
seventh a ring, were discovered. Five of the reliquaries (1 to 3, 5and 6 below, 1,4,5,2 and 3) where shaped like stupa and the remaining one was a bead (7 below) Three of the stupa reliquaries (1 to 3 below) all Contaning relics and a ring were recovered from within
9)
the sockets cut into the drum of the stupa of cave no 3 . The other two stupa reliquaries 5 and 6 were found in the midst of the debris in front of cave 4 and the bead reliquary within a socket in a broken boulder lying amidst the same debris. "
10)
अतिशय महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान अवशेष म न देशपांडे सरांनी उत्खननातून शोधून काढले होते. आज हे अवशेष कुठे आहेत कळायला मार्ग नाही कदाचित औरंगाबाद पुरातत्व विभागाकडे ही अमुल्य ठेवा असण्याची शक्यता आहे.

२) इसपुर्व दुसऱ्या शतकातील भाजे लेणी ही मावळ तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील
11)
आद्य लेण्यांच्या पैकी एक, पितळखोरा लेणी भाजे लेणी आणि अजिंठा लेणीतील ९ व १० नंबरची लेणी समकालीन. भाजे लेणीचे वैशिष्ट्यं म्हणजे चैत्यगृहातील स्तूपावर असलेली झीलाई मौर्य काळातील अशोक स्तंभावर जशी झीलाई आहे तशीच झीलाई या स्तूपावर देखील आहे या स्तूपात पूर्वी हर्मिकेच्या मधल्या
12)
खोबणीत अस्थी रक्षा किंवा अस्थी करंडक ठेवण्यात आले होते अशी नोंद The Rock-cut Caves Of Pitalkhora In The Deccan या रिपोर्ट मध्ये तसेच James Burgess यांनी आपल्या The Cave Temples of India या पुस्तकात म्हटले आहे व डॉ अनिल कठारे सरांच्या "भारतीय कलेचा इतिहास"
13)
या पुस्तकातून ही मिळते, भाजे लेणी इथे पुढे जे दगडात कोरलेल्या चौदा स्तूपा पैकी दोन स्तूपाच्या वरच्या भागात अस्थी रक्षा/ करंडक ठेवण्याची नोंद आहे. प्रमुख भिख्खूंच्या या अस्थी कुठे आहेत हे मुंबईच्या पुरातत्व सर्कल देखील माहिती नाही.
३) कार्ला लेणी थेरवादी परंपरेतील
14)
महत्वपूर्ण व अप्रतिम लेणी इ स पहिल्या शतकात खोदण्यात आलेल्या लेणीला दान देणाऱ्या शेठ भुतपाल यांनी म्हटले आहे की "जंबुद्विपातील सर्वात अप्रतिम चैत्यगृह " खरच ही अप्रतिमच लेणी आहे शिल्पकलेतल्या सर्व उणीवा या लेणीत शिल्पकारांनी भरून काढली आहे. थेरवादी परंपरेतील शेवटच्या
15)
कारकीर्दीतील ही लेणी या लेणीत आपल्याला काष्ठशिल्पाची कारागिरी छत्रावलीच्या रूपाने आजही पहायला मिळते जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी केलेले काम आजही सुस्थितीत आहे या छत्रावलीच्या खालच्या खोबणीत पूर्वी अस्थी रक्षा /करंडक ठेवण्यात आले होते असे James Burgess यांनी आपल्या The Cave
16)
Temple's of India यात नमूद केले आहे.
तसेच एक महत्त्वाची नोंद/ शिलालेख म्हणजे डाव्या बाजूला असलेल्या स्तंभाची रांग आहे त्याच्या पाचव्या क्रमांकाच्या (कमळाचे फूल कोरलेला स्तंभ ) स्तंभावर आहे हा शिलालेख पुढील प्रमाणे आहे

"सोपारा भयंतानं धमुतरियानं भाणकस सातिमितस ससरीरो
17)
थबो दानं"
काय म्हणतो हा शिलालेख की सोपारा इथल्या "धर्मोत्तरीय" ( पंथाच्या ) भदंत यांच्या शिष्य सातिमित याची शरीर अवशेषांसह स्थंभाची देणगी, या स्तंभात अस्थी रक्षा ठेवण्यात आले होते असे या शिलालेखातून दिसून येते. यामुळे दोन गोष्टी स्पष्ट होतात की लेणीत अस्थी रक्षा
18)
ठेवण्याची पद्धत होती व बौध्द धम्मात अनेक पंथ पडले होते त्यातील "धर्मोत्तरीय" हा एक पंथ होता, आता "धर्मोत्तरीय" पंथानेच कार्ला लेणीत का अस्थी रक्षा ठेवल्या होत्या या विषयावर शिवाजी सोनावणे सर आपल्या "सोपारा बौध्द संस्कृतीचे केंद्र" या पुस्तकातून म्हणतात की
"सम्राट अशोकाने
19)
महाराष्ट्रात बौध्द धम्माच्या प्रचाराच्या दृष्टीने नियोजन केलेले दिसते त्या काळात प्रचारासाठी सोपार्या प्रमाणे भाज्यालाही महत्त्व दिले. हा परिसर धम्म प्रसाराच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा होता तितकाच व्यापाऱ्याच्यादृष्ट्याही महत्त्वाचा होता. सोपारा येथे सम्राट अशोकाने यवन
20)
धम्मरक्षित नावाच्या धम्म प्रसारकास पाठविले. पश्चिम किनाऱ्यावर त्या काळात ग्रीक व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये जा चालू होती. इ स पुर्व तिसर्‍या शतकापासून धम्म प्रसारास गती आली होती. अपरांत व महाराष्ट्रात त्यावेळी सातवाहन राजाची राज्यसत्ता होती इ स पुर्व २३५ ते २२५ या
21)
काळात रोमशी भारताचा व्यापार चालत होता. सुती, रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, हत्ती दंत इत्यादी गोष्टी भारतातून निर्यात होत असत व तांबे, शिसे, लोखंडी अवजारे, भांडी, मूर्त्या, दारू या वस्तू भारतात यात होत. त्यामुळे सोपारा, कल्याण, ठाणे, घारापुरी, चोल इत्यादी बंदरांना
22)
व घाटमार्गाना महत्त्व आले होते. याचा बौध्द धम्माच्या प्रचार प्रसारास बौध्दांनी चांगला उपयोग करून घेतला. या काळापर्यंत बौध्द धम्मात अठरा पंथ निर्माण झाले होते. त्यांच्यापैकी पाच पंथ अपरांतात व महाराष्ट्रात पोहचले होते. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर ( इ स पुर्व

23)
४८३ ) शंभर वर्षानंतर जुन्या सथविरवादी पासून महासंघिक वेगळे झाले त्यामुळे बौध्द धम्मत हीनयान व महायान हे दोन पंथ निर्माण झाले. आणि त्याची थोड्या प्रमाणात सुरूवात झाली त्यातही स्थविरवादीनच्या (हीनयान पंथ) पंथातही उपपंथ निर्माण झाले त्या पैकी "धर्मोतरी" या पंथाचा प्रसार
24)
सोपार्याहुन झाला. त्यासाठी भाजा हे केंद्र निर्णय झाले. कारण भाजा हे ठिकाण त्या काळातील प्रमुख व्यापारी मार्गवर होते. घारापुरी व चोलहुन धरमतर, पाली वाघाजाई घाट आणि भाजा हा मार्ग बोरघाटापेक्षा महत्त्वाचा होता.
"धरमतर" हा शब्द "धर्मोतरी" या पंथावरुन आला असवा असे डी डी
25)
कोसंबी मानतात, जुन्नर परिसरात धर्मोतरी पंथाचा प्रभाव होता. भाजा हे केंद्र इ स पाचव्या शतकापर्यंत टिकून होते. नंतरच्या काळात त्याचा ताबा महायान पंथ यांनी घेतला असे दिसते. भाज्या नंतर साधारण शंभर वर्षानंतर बेडसा हे धम्म प्रसाराचे उपकेंद्र निर्माण झाले. येथे चैत्यगृहात पंधरा
26)
लेणी व तीन शिलालेख निर्माण झालेला दिसतात. बेडसा येथील लेणी धम्म प्रसारकांच्या व व्यापाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. भाजाहून व बोरघाटातून येणारे व पूर्वेकडे जाणारे मार्ग येथे मिळत होते. येथे महायान पंथीयांनी उत्तर काळातील मातृ देवता यंमाईचे एक शिल्प एका विहारात
27)
शिल्पांकीत केले आहे. इ स पहिल्या शतकापर्यंत बेडसा हे बौध्द धम्माच्या प्रसाराचे केंद्र होते. त्या नंतर चारशे वर्षांनी म्हणजे इ स दुसऱ्या शतकानंतर कार्ला हे नवीन धम्म प्रसाराचे केंद्र उदयास आले. कार्ला येथे भारतातील प्रसिद्ध व अद्वितीय असे चैत्यगृह आहे. कार्ला ह्या नव्या
28)
धम्म प्रसार केंद्राच्या उदयाचे कारण धम्म प्रसारा प्रमाणेच रोमन साम्राज्याशी भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला होता. ठाणे कल्याण बंदरातून येणारा माल बोरघाट मार्गेने येत असल्यामुळे बोरघाटाचे महत्त्व वाढले. कार्ल्याहून एक मार्ग उत्तरेस जुन्नरकडे व दुसरा मार्ग पूर्वेकडे
29)
जात असे. शिवाय भाजाहून कार्ल्याकडे येणारा मार्ग होताच. यातील अनेक मार्ग प्रागौतिहासिक मार्गांना अनुसरून विकसित झालेले होते.
भाज हे जसे धर्मोतरी पंथाचे केंद्र होते तसेच कार्ला हे महासंघिकांचे केंद्र होते. त्यांनी बौध्द धम्मात मूर्ती पुजा सुरू केली. इ स पाचव्या शतकापर्यंत
30)
कार्ला हे धम्म प्रसाराचे केंद्र होते. या काळात बौध्दांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धम्म प्रसाराचे केंद्र होते. या काळात बौध्दांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धम्म प्रसाराचे कार्य केले. ग्रीक, रोमन, पारसिक या यवनांनाही बौध्द संस्कृतीत सामावून घेतले व त्यामुळे त्या
31)
काळातील यवन भारतीय समाजात एकरूप झाले होते "( हा शोध भारताचा - भाजा ते कार्ला, यशवंत रायकर - लोकसत्ता )

वरील ही काही उदाहरणे आपण लक्षात घेतल्यास लक्षात येते की प्रत्येक लेणीत अशी अस्थी रक्षा /करंडक ठेवण्याची पद्धत होती, पण आज ही अस्थी करंडक कुठे आहेत ठाऊक नाहीत मुंबई
32)
सर्कला विचारपूस केली असता त्यांच्या कडून नकारार्थी उत्तर मिळाले आहे हा अमुल्य ठेवा जतन करून ठेवण्याची गरज आहे पण उलटपक्षी यांची हेळसांड होताना दिसत आहे.

संदर्भ :

१) The Cave Temples of India, James Burgess

२) The Rock -Cut Caves of Pitalkhora In Deccan, M N

33)
Deshpande

३) सोपारा बौध्द संस्कृतीचे केंद्र, शिवाजी सोनावणे

४) भारतीय कलेचा इतिहास, डॉ अनिल कठारे
34).

#सूरज_रतन_जगताप
You can follow @Jollybo71936649.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: