हम कथा सुनातें हैं..
प्रभु श्रीरामचंद्र-सुग्रीव, कृष्ण-अर्जुन, कृष्ण-सुदामा, कर्ण-दुर्योधन, छत्रपती शिवाजी महाराज-तानाजी मालुसरे, छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशजी..किती तरी जोड्यांची नांवे घेऊ शकतो आपण ज्यांनी 'मैत्री' या शब्दाची व्याप्ती हिमालयापेक्षा उत्तुंग केली.👇
सबकुछ शेअर करण्याचा हक्काचा कोपरा. सुख दुखाःतल्या अश्रुंची वाट आणि हक्काचा खांदा. नो फॉर्मलिटीज आणि दिखाऊपणा. यशाच्या शिखरावर असतांना 'माझा मित्र' आहे हे छातीठोकपणे सांगणारं आणि संकटात 'मी आहे' म्हणत तोफेच्या तोंडी जाणारं नातं म्हणजे मैत्री. एक में दो चाय..मैत्री.👇
दोन डोळ्यांनी बघितलेलं आणि सत्यात आणलेलं एक स्वप्नं आणि एका मैत्रीची गोष्ट.
मैत्री ज्याची बॉण्डींग 37 वर्षांची आहे. मैत्री जी निरपेक्ष आहे..फक्त अमर्याद विश्वास आणि प्रचंड आदर हे एकमेव ज्या मैत्रीचं आधारमुल्य आहे अश्या मैत्रीची गोष्ट.
गोष्टीचे नायक..👇
32 वर्षांचे प्रचारक नरेंद्रभाई युवक कृतीदलाचे प्रमुख म्हणून अहमदाबादेत जातात काय आणि अवघ्या 17 वर्षांच्या संघ स्वयंसेवकाला भेटतात काय..? सन 1982.
त्यावेळी कदाचित या दोघांनीही विचार केला नसावा की येणाऱ्या काळात कोणते कार्य त्यांच्या हातुन होणार आहे. 👇
1984 ला नरेंद्रभाई जिल्हा प्रचारक झाल्यानंतर आदरणीय बाळासाहेब देवरसांनी भाजप मध्ये कार्य करण्याची सुचना केली. मोजक्या स्वयंसेवकासह भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्या नरेंद्रभाईंच्या टिममधील एक कार्यकर्ता होता अमितभाई शहा. नरेंद्रभाई1985 आणि अमितजी 1986 साली भाजपमध्ये सक्रीय झाले.👇
संकटात संधी शोधणारी जोडी ही आजची नाही तर तेव्हापासुनची कार्यपद्धती आहे. विश्वास ठेवा इथेही अमितभाई सर्वात पुढे आहेत. किंबहुना नरेंद्रभाईंनी राजकारणातील अवघड परिस्थीतीमध्ये काम करण्याचं अमितजींचं कौशल्य तेव्हाच हेरलं आणि त्यापद्धतीने दायित्व पण दिलं. आणि अमितभाईंनीही विश्वास..👇
सार्थ ठरवला.सलग 10 वर्ष अखंडपणे पक्षवाढीसाठीचे प्रयत्न करतांना ऐकमेकांना साथसोबत करत पहिला विजय दृष्टिपथात आला तो सन 1995 मध्ये. गुजरात राज्यात बहुमताचे सरकार अनुभवलेल्या कॉंग्रेसला पराभवाची धुळ खायला देत.तरीही सामान्यांशी असणारी कॉंग्रेसची नाळ घट्ट होती ती पाच वर्षांत साफ झाली👇
काही कारणास्तव केशुभाई पटेल 1996 मध्ये बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत नरेंद्रभाई आणि अमितजी पण. पुढे 1997 मध्ये अमितभाईंसाठी सारखेजची जागेसाठी तिकीट मिळवण्यात मोदीजी यशस्वी झाले. तिथे 1998 मध्ये स्वतःची सीट राखण्यात अमितभाईसुद्धा यशस्वी झाले. आज इथे मोदीजी आमदार सुद्धा नाहीत.👇
याची परतफेड म्हणून गुजरात भाजपाचा ताकदवान चेहरा असणाऱ्या नरेंद्रभाईंना 2001 मध्ये मुख्यमंत्री बनवण्यात अमितजींचे योगदान भरपुर आहे. याच मंत्रीमंडळात अमितजींकडे गृह,कायदा,न्याय,ग्रामरक्षक दल,तुरूंग,नागरी सुरक्षा,करशुल्क,वाहतुक,होमगार्ड, सिमासुरक्षा,पोलीस गृहनिर्माण अशी खाती दिली.👇
आधार फक्त विश्वास. तेव्हापासून आजपर्यंत. कुठलेही संकट आले तरी ऐकमेकांची पाठ न सोडण्याची वृत्ती आणि निरपेक्ष भाव. इथे चार पैश्यांचा आणि फुटकळ पदाचा बडेजाव अनेकांच्या मैत्रीला वादग्रस्त करतो. ही तर फक्त सुरवात होती. आपण काय गप्पा मारतो हो मित्रांसोबत चहा पितांना, समोसे खातांना..?👇
अमितभाई म्हणत असतील आप एक दिन प्रधानमंत्री बनोगे। आप में वो सब खुबियां है। मै हूं ना..। हा जो 'मै हूं ना' असतो ना तो फार महत्वाचा असतो. मैत्रीमध्ये. सगळ्यात मोठा आधार आणि हिमालयाशी टक्कर घेण्याची प्रेरणा देणारा शब्द मित्राच्या तोंडून येणारा, 'मै हूं ना..'। 👇
2014 च्या आधी काही दिवस अमितभाईंना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले. 80 पैकी 71 जागांवर भाजपाचे आणि आधुनिक राजकारणाचे आधुनिक चाणक्य म्हणून अमितभाईंचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले. संपुर्ण लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवण्याची किमया तीन दशकांनंतर साधली होती
मोदी-शहा जोडीने. 👇
कॉंग्रेसच्या जन्मापासुनचा पहिला लाजीरवाणा पराभव अवघ्या 44 जागा संपुर्ण देशभरात. आणि नरेंद्रभाई भारत देशाचे पंतप्रधान झाले.
'' मैं, नरेंद्र दामोदरदास मोदी. ईश्वरसाक्ष शपथ लेता हूं..." या वाक्याने सर्वात जास्त आनंदी झालेला व्यक्ती असेल अमितभाई शहा. स्वप्न पाहणे आणि सत्यात आणणे..👇
याची प्रचिती याची देही, याची डोळा अनुभवणारे अमितभाईंच्या भावना एक मित्र म्हणून काय असतील ते आपण समजु शकतो.
त्याच वर्षी (2014) अमितभाई भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि सुरवात झाली आणखी एका स्वप्नाचा पाठलाग करण्याची. ज्याची बिजं रोवली गेली होती 28/05/1996 रोजी.👇
अवघ्या 13 दिवसांचं सरकार पाडण्यासाठी हसत खिदळत हातभार लावलेल्या सर्वांसाठी श्रद्धेय अटलजींनी सांगुन ठेवलं होतं, "आज तुम्ही माझ्यावर हसताय उद्या आम्ही तुमच्यावर हसु...अंधेरा छटेगा, कमल खिलेगा." अवघ्या 20 वर्षांत केंद्रात संपूर्ण बहुमताचे आणि 14 राज्यांत भाजपाचे सरकार स्थापन.👇
अभी कुछ और आना बाकी था..2016मध्ये फरत पक्षाध्यक्ष म्हणून अमितभाई 'निवडून' आले. पंतप्रधान म्हणून मोदीजी आणि पक्षाध्यक्ष म्हणून दोघेही ऐकमेकांच्या सामर्थ्यावर विश्वास आणि आदर ठेवून कामकरत होते. 2019 लोकसभा निवडणूकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष आणि सर्वाधिक जागांसह सरकारमध्ये आला.👇
'कार्यमग्नता जीवन व्हावे..' उक्तीप्रमाणे 1984 पासुन सुरू झालेला निस्वार्थ मैत्रीचा प्रवास 37 वर्षांचा झाला. आजही तोच विश्वास, आदरभाव आणि नात्याचा सन्मान कायम आहे. 2019 च्या विजयानंतरच्या पत्रकारसभेत पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरे पंतप्रधान म्हणून न देता, 'मी फक्त पक्षाचा....👇
...कार्यकर्ता आहे. उत्तरं अध्यक्ष देतील' असे म्हणणारे मोदीजी अमितभाईंच्या पदाचं आणि कर्तृत्वाचं श्रेय घेत नाहीत.हे उदाहरण इतर कुठल्याही राजकीय पक्षामध्ये मी तरी पाहिलेलं नाही. माझा मित्र पंतप्रधान आहे या भावनेचा लवलेशही अमितभाईंच्या चेहऱ्यावर कधी दिसत नाही.👇
पक्ष कार्यालयात आल्यानंतर आजही अमितभाई स्वतः गाडीजवळ जाऊन मोदिजींचं यथोचित स्वागत करतात. मैत्री आहे तर त्याचा उथळपणा कधीही दोघांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. वैयक्तिक मैत्रीपुर्ण संबंध असतांनाही हातात हात घेऊन फिरतांना किंवा खांद्यावर थाप देतांना कधीही दिसत नाही.👇
संकटात संधी शोधणारी जोडी म्हणून हिणवले गेले तरी ऐकमेकांच्या सल्ल्यांशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय दोघेही पुढे जात नाहीत. हे सगळ्या जगाला माहिती आहे फक्त या दोघांना नाही. असंच चित्र पहायला मिळते. राजकारण आणि प्रशासन यापलीकडे मोदिजींच्या विचारशक्तीला समजणारे एकच आहेत अमितजी.👇
आनंदाने मिठी मारतांना एकही प्रसंग पहायला मिळणार नाही कारण सार्वजनिक जिवनात परस्पर आदरभाव जपण्याचं तंत्र दोघांनी 37 वर्षांपासुन पाळलं आहे. अटलजींची स्वप्नं पुर्ण करण्यासाठी जे जे शक्य आहे ते करणे याकामी हवे ते प्रयत्न करण्यासाठी दोन्ही एकविचारी मित्र सदैव तत्पर असतात.👇
अशाच निरपेक्ष मैत्रीची आज आपल्यालाही गरज आहे. स्वप्नं आणि प्रयत्न फक्त यश संपादन करण्यासाठीच. ऐकमेकांवरचा विश्वास तसुभरही कमी न करता नात्यातील स्वातंत्र्य पाळत निभावलेली मैत्री अजरामर होते हे सिद्ध करणारी ही गोष्ट तात्पुरती थांबवतो.

#friendship_goals.
You can follow @swami_vachan.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: