आश्चर्य @BJP4India यांचे वाटायला लागले आहे. न साधूंच्या हत्येबद्दल कोणाला जाब विचारला, ना कोरोना काळात पोलिस करत असलेल्या मारहाणीबद्दल विरोध केला, ना कोव्हीड उपचारातली हयगय यांच्नाालक्षात आली, ना यांना बलात्कार लक्षात आले, ना अनेक लाखांची वैद्यकीय बिले दिसली,
+
ना अनेक हजारांची विजेची बिले दिसली, ना पूर परिस्थिती दिसली, ना कोव्हीड चा हल्लकल्लोळ दिसला, ना वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांचे चाललेले हाल दिसले. लोकाचे आक्रोश यांना दिसले नाहीत. या सर्व बाबीवर मिडिया आणि सोशल मिडिया वरून हल्ला व्हायला हवा होता.
+
हे भोळसटा प्रमाणे सरकार म्हणाले राजकारण करू नका त्याला मम म्हणून गप्प बसून राहिले. राजकारण करू नका म्हणजे आवाज उठवू नका असा अर्थ घेतला असावा यांनी.

सरकार म्हणाले अधिवेशन २ दिवस त्याला ही हे मम म्हणाले. अधिवेशन किमान १ आठवडा घ्यायला काय हरकत होती ?
+
अजूनही मागणी करा तात्काळ अधिवेशन घ्यायची. मांडा सरकारच्या चुका पटलावर. पण तसे करणे जमणार नाही कारण यांचे एकमेव खंदे वक्ते देवेंद्र तिकडे बिहारमध्ये. मग यांच्याकडून बोलणार कोण ? शेलार ? ते स्वस्त भाजी STALL वगैरे लाऊन बसतात. यांच्याकडे दुसरे कोणीही जोरदार वक्ते नाही.
+
यांचा सोशल मिडिया संघ पण अखंड झोपलेला असतो. कुठलेही अभ्यासू प्रकटन त्यांच्याकडून होत नाही. ना ते पक्षपाती पत्रकार आणि चॅनेल्स विरुद्ध काही मोहीम चालवू शकतात. तिकडेही सावळा गोंधळ.

@BJP4India अरे बाबांनो जागे व्हा. हितचिंतक तुमच्याकडे अपेक्षेने पहात आहेत. करा थोडी बोंबाबोंब.

___
You can follow @emailtovinay.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: