मोहनदास करमचंद गांधी उर्फ बापु उर्फ महात्मा गांधी. आज जयंती आहे तुमची. लहानपणी शाळेत असतांंना 1 ऑक्टोबरला च शाळेत वक्तृत्व स्पर्धा असायची. कधी भाग घेतला नाही. श्रोता म्हणून ऐकत राहिलो. खरं सांगू का..? गुजरात मधील पोरबंदर या गावी झालेला तुमचा जन्म या वाक्याने सुरू होणारे भाषण..👇
तुमचा रेल्वेप्रवासातला धक्का, साऊथ अफ्रिकेतला लढा,भारतातलं आगमन, कपड्यांना तिलांजली, उपोषणं, चळवळी, आंदोलनं, आपल्या भारत देशाचं स्वातंत्र्य, अहिंसेचा मार्ग आणि नथुराम गोडसे इथपर्यंतचा प्रवास सगळेजण रट्टा मारून येत आणि सांगत. त्यांंना बक्षीसंही मिळायची. त्यापैकी बरेचसे...👇
शालेयमित्र ज्यांंना बक्षिसे मिळालीत ते आज तुम्हांला काहिही बोलतात.म्हणजे माझं मत काही वेगळं आहे असं नाही.तुम्ही केलेला त्याग, प्रयत्न, लढा, तुमची तत्वं सत्याचे प्रयोग, स्वच्छता,स्वयंसेवी वृत्ती याबद्दल मला काहीही शंका नाही पण ती तुम्हांला महात्मा पदी बसवावीत एवढीही मोठी नव्हती👇
बापु तुमच्या नावाचं मार्केटिंग इतकं जबरदस्त झालं की तुमच्याच जयंतीदिनीच्या भाषणात तुमचे अनुयायी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा उल्लेख शेवटच्या दोन ओळिंत विनम्र अभिवादन एवढाच राहिला. नक्कीच तुमचं ब्रैंडिंग केलं जावं हे तुम्हांला पटणारं नसेल पण ते झालं..👇
बिनाखड्ग बिना ढाल स्वातंत्र्य मिळवून देणारे म्हणून तुमचं मार्केटिंग करतांना अनेकांची बलिदानं झाकोळून टाकण्यात आली. आशिषकुमार, बाबु गेनू, प्रितीलता वड्डेदार, वासुदेव बळवंत फडके यांची नावं आजच्या पिढीला ऐकायलाही मिळत नाहीत. आज शाळा सुरू असत्या तर 30 /40 छोटे बापु पंचा गुंडाळून..👇
अवतरली असती शाळेत. पण शास्त्रीजी बनुन आलेल्यास उत्तेजनार्थ बक्षिसही मिळाले नसते.
अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागवण्यासाठी लागणारे पैसे त्यावरही तुम्हीच आहात.तुमच्या असण्याची अडचण नाही पण तुमच्याच फोटोला अनुसरून होणारा भ्रष्टाचार तुमच्या विचारांना कलंक लावणारा आहे..👇
तुमच्या थोरपणाबद्दल आणि अहिंसेच्या मुल्यांबद्दल शंका नाही. पण ज्यासाठी तुम्ही माझ्या देशाचे दोन तुकडे केले तो हेतु आजही साध्य झालेला नाही. वाळवी पोखरतेच आहे. आणि गंमत सांगु..आज लोकलज्जेसाठी अनेक गुंड तुमच्या विचारांचे कोट्स आणि फोटो टाकताय आणि तुमचं महत्व विषद करताय. 👇
राग तुमचा नाही तुमच्या ब्रैंडिंगचा आहे. 'सबकुछ गांधी' कसं मान्य करावं.. संजय दत्त ने गांधीगिरीचं महत्व सांगितलं बापू आणि आमिरखानने तुमच्या फोटोची किंमत. तुम्हांला पुजणारे आणि शिव्या देणारे दोघांनी हास्यकल्लोळात तुमचा अपमान पॉपकॉर्न सोबत खाऊन टाकलाय. हे तुमच्या विचारांचं यश का? 👇
बापु..स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतरही गरिबी हटाव हा नारा आहे तुमच्या पक्षाचा..तुमच्या म्हणजे ज्यांनी तुम्हांला रॉयल्टी न देता त्यांचा ब्रैण्ड अम्बेसेडर बनवला त्या कॉंग्रेसचा. नेहरूंच्या पुढच्या पिढीनेही अखंड ब्रैण्डींग केलंय तुमचं अगदी आजही होत आहे. तुम्हीही बघतच असाल..? 👇
तुम्हांला न मानणारे थेट गोडसेंचे वशंज म्हणून जाहीर होतात. मग तुमच्या ब्रैण्डमुळे झाकोळलेल्या बलिदानी व्यक्तींची प्रत्येक पिढी गोडसे आणि गांधी विरोधी म्हणूनच गणली जाणार का..? तुम्ही असता तर माझ्यासारख्या अनेकांनी तुम्हांला अनेक प्रश्न विचारली असती. खरं सांगतो तेव्हाही तुम्ही मौन👇
व्रताचा आधार घेत सगळ्यांना कोललं असतंत.
भगतसिंग-राजगुरू-सुखदेव.
सुभाषचंद्र बोस.
सरदार पटेल.
या विभूतीही तुमच्या सोबत असतीलच ना स्वर्गात..? नजरेला नजर भिडवता का तुम्ही तिथे.. का तिथेही मौनव्रत आहे तुमचं..?

🙈🙉🙊

BTW.. Happy Birth Anniversary. .!👇
You can follow @swami_vachan.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: