#नेता_कसा_असावा

मला माहिती नाही किती ट्विट चा थ्रेड बनेल हा.. पण एक प्रयत्न करतोय आपल्या लाडक्या देवाभाऊंनी @Dev_Fadnavis आणि @BJP4Maharashtra ने लाॅकडाऊन लागल्या पासुन केलेल्या कामांचा आढावा घेण्याचा.
#NitinWrites 👇🏻
कोविड भारतात दाखल तर जानेवारी मध्येच झालता पण महाराष्ट्रात आणि देशभरात जवळजवळ २२ मार्च पासुन लाॅकडाऊन घोषित झाला. सगळ्यांसाठी अशा प्रकारे घरात बसुन राहणे नवीनच होते. सगळ्या व्यवस्था ठप्प झाल्या होत्या. सधन लोकांचे तरीही ठीक होते. पण वाईट वेळ होती हातावर पोट असणार्‍यांसाठी 👇🏻
असल्या सगळ्यांसाठी #DevendraFadnavis जींच्या नेतृत्वाखाली @BJP4Maharashtra कामाला लागली होती.
देवाभाऊ सतत भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार, पक्षातील विविध सेल चे प्रमुख यांच्याशी संपर्क करत आणि जमीनीवर सतत लोकांना मदत करण्याचे आवाहन करत. 👇🏻
ज्याला जसे जमेल तश्या तर्हेने सर्व भाजपा महाराष्ट्र लोकांच्या मदतीसाठी सरसावली होती. प्रत्येक जण आपआपल्या गावात, शहरात गरजवंतासाठी राबत होता. सामाजिक भान सगळ्यांनी जपले होते पण त्यात कुठेतरी भाजपा महाराष्ट्र सगळ्यात पुढे होती. 👇🏻
दिवस पुढे जात होते तसे विविध संकटे समोर येत होती आणि जेंव्हा हे #तिकडम_सरकार काही ऐकत नव्हते तेंव्हा शेवटी राज्यपाल महोदयांकडे सगळ्या समस्या मांडण्यात आल्या. त्यादरमान #मामु यांना देखील #DevendraFadnavis जी सतत पत्र लिहुन विविध समस्या आणि त्यांचे निराकरण देखील द्यायचे. 👇🏻
नंतर लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि त्या टप्यात ही @BJP4Maharashtra चे अन्नदान आणि विद्यार्थ्यांना मदत करून सुरक्षीत घरी पोहचवण्याचे कार्य सुरू होते तर तिकडे #DevendraFadnavis जी सतत राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी बोलुन अडचणी आणि भावी आव्हान यांवर संवाद साधत होते.
नुसता संवाद साधुन थांबेल ते #DevendraFadnavis जी कसले. त्यांनी कामगार संघटना असो की वकील संघटना असो की व्यापारी वर्ग असो यांना बोलुन त्यांच्या समस्येवर निराकरण करण्यासाठी शासनाकडे देखील पाठपुरावा केला तसेच एका लढवय्या नेत्यासारखे सतत त्या सगळ्यांना मार्गदर्शन देखील करत राहीले. 👇🏻
कोरोना सोबतची लढाई संपत नव्हती. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात रोगराई पाय पसारत होती. त्याकाळात ज्यांनी सत्तेची खुर्ची बळकावली होती तो #मामु त्या खुर्ची सोबत आलेली जिम्मेदारी विसरून सर्वदलीय बैठकीला देखील घरातुनच उपस्थित राहीला होता त्या #मामु कडुन राज्याला आता आशा नव्हती. 👇🏻
अशा कठीण समयी आपले #DevendraFadnavis जी समोर आले आणि सतत वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटी गाठी करू लागले. विविध जिल्ह्यांचे दौरे त्यांनी सुरू केले. आणि नुसतेच दौरे ते करत नव्हते तर यंत्रणा देखील एक प्रकारे ते कामाला लावत होते. 👇🏻
रूग्णांची होणारी हेळसांड असो की काम करतांना आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण असो हे प्रत्येक ठिकाणी ते अनुभवत होते आणि तो कमी करण्यासाठी त्यांना जे जे शक्य होते ते काम देखील ते करत होते. 👇🏻 #DevendraFadnavis
पुणे-मुंबई तर सोडाच, #DevendraFadnavis जींनी प्रत्येक विभागातील २-३ जिल्ह्यांचा दौरा केला आणि हतबल झालेल्या लोकांना आणि यंत्रणेला देखील उर्जा देण्याचे काम त्यांनी केले. 👇🏻
#निसर्ग वादळाचे संकट कोकणात आले असतांना देखील तिथे मदत सामग्री पाठवण्यापासुन प्रत्यक्ष २ दिवस कोकणाचा दौरा करून #DevendraFadnavis जींनी तिथल्या लोकांचे हाल पाहीले. 👇🏻
भरघोस सरकारी मदतीची वाट तर कोकण आज पण पाहत आहे पण त्यावेळेस तिथल्या जनतेला प्रत्यक्ष त्या संकटकाळी धीर द्यायचे काम कोणी केले असेल तर ते फक्त #DevendraFadnavis जींनी केले. 👇🏻
२ दिवसाचा कोकण दौरा झाल्यावर मुंबईत आल्या आल्या #DevendraFadnavis जींनी लगोलग कोकणवासीयांच्या समस्या आणि त्यांवर उपाययोजना कश्या कराव्यात ह्याचे सविस्तर पत्र #मामुं ना प्रत्यक्ष भेटुन सुपुर्द केले. त्यावर काय कार्रवाही केली असेल #मामुं नी हे सर्वच जाणतात.👇🏻
दुसरीकडे #DevendraFadnavis जींचे महाराष्ट्रातील दौरे देखील जुलैच्या मध्यावधी पर्यंत संपले होते. त्या दौर्‍यांमधुन त्यांना जे जे आढळुन आले आणि काय काय करणे गरजेचे आहे याचे सविस्तर पत्र (14 पानी) त्यांनी #मामुं ना दिले होते. https://twitter.com/dev_fadnavis/status/1282681302437621760?s=21
त्या पत्रावर काही कार्रवाही झाली असल्याचे सध्या तरी आढळुन आलेले नाही.

हे सगळे होत असतांनाच #DevendraFadnavis जी राज्यातील भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ घेऊन राज्यातील समस्या केंद्रासमोर ठेवण्यासाठी दिल्ली ला पहुंचले. २ दिवसाच्या दिल्ली दौर्‍यात त्यांनी बैठकांचा धडाका लावला.👇🏻
सगळ्यात आधी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील साखर उद्योगाबाबत आणि त्याच्या पैकेज साठी त्यांनी सविस्तर मागणी केली. यांवर पुढच्या काही दिवसात केंद्र सरकारने उसाचा MSP वाढवुन देऊन #DevendraFadnavis जींच्या मागण्यांची दखल घेतली. 👇🏻
त्यानंतर केंद्रीय कृषीमंत्रींची भेट आणि इतरही दुसर्‍या मंत्र्यांची भेट घेत #DevendraFadnavis जी विरोध पक्ष नेता असुनही महाराष्ट्रासाठी आणि ह्या सरकारद्वारे एक प्रकारे वार्‍यावर सोडलेल्या जनतेसाठी सतत राबत होते. फिरत होते.
कोरोना च्या कठीण काळात स्वत:च्या आरोग्याची कसलीही तमा न करता केवळ जनतेसाठी म्हणुण #DevendraFadnavis जी सगळीकडे सतत फिरले आणि ह्या निष्क्रीय राज्य सरकारच्या प्रमुखाला जागे करण्याचा प्रयत्न केला पण एक पुणे आणि कोकणाचा २-४ तासाचा दौरा सोडला तर ते काही घराबाहेर पडलेच नाहीत. 👇🏻
पण #नेता_कसा_असावा याचा उत्तम परिपाठ #DevendraFadnavis जींनी आज आपल्यासमोर ठेवला आहे. संकटांना न घाबरता सतत कार्यरत रहावे आणि जनतेच्या सेवेचे जे व्रत हाती घेतले आहे त्यात कसलीही कसुर ठेवु नये याचे उदाहरण @Dev_Fadnavis जींनी आपल्या समोर ठेवले आहे. 👇🏻
एका परिवाराचा प्रमुख कसा कोणत्याही संकटकाळात धिरोद्दत उभा राहुन आपल्या परिवारावर आलेले संकट टोलावण्यासाठी सतत राबत असतो तेच काम आज #DevendraFadnavis जी महाराष्ट्र परिवारासाठी करत आहेत.
खरंच आपण लोकं भाग्यशाली आहोत जे आपण या विचारधारेशी जोडलेले आहोत 👇🏻
जिथे आपले नेते ‘सेवा परमो धर्म’ हा व्रत घेऊन निघाले आहेत आणि जनसेवेचे उच्च मापदंड ते आपल्यासमोर देखील ठेवत आहेत.
#नेता_कसा_असावा तर तो जनतेसाठी आणि त्याच्या सोबतच्या सहकार्‍यांसाठी देखील 24x7 उपलब्ध असणारा असावा; अजुन सोप्या भाषेत सांगू तर तो #DevendraFadnavis जीं सारखा असावा. 🙏🏻
You can follow @The_NitinD.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: