राहुल गांधींच्या विरोधात पहिल्यापासून सक्रियपणे बदनामीची मोहीम राबवली गेली. पप्पू अशी प्रतिमा निर्माण करून त्यांचा प्रत्येक बोलण्याला हवेत उडवून लावून, खिल्ली उडवून मूळ मुद्दा चर्चेत न आणणे हे भाजपने अगदी पद्धतशीरपणे साध्य केलं आहे.
#SoniaGandhi #RahulGandhi #Congress
याच महत्वाचे कारण म्हणजे गांधी घराण्याचा असणारा जेवढा दैदिप्यमान तेवढाच त्यागाचा वारसा. संघाला पूर्णपणे जाणीव आहे की त्यांच्या कल्पनेतील हिंदुराष्ट्रच्या मार्गातील मुख्य आणि खरा अडथळा नेहरू-गांधी यांचा वारसच आहे. बाकी कॉंग्रेसचे मातब्बर आधुनिक काळातील नेते हे मूळचे सरंजमदारच
त्यामुळे त्यांचा मूळचा कल जहागिरी टिकवण्याकडेच त्यामुळे हिंदुराष्ट्र निर्मितीला ते प्रामाणिक विरोध, टोकाचा संघर्ष हे कधीच करणार नाहीत. हे मागील 6वर्षात सिंधिया सारख्या कित्येक नेत्यांनी सिद्ध केलं आहे.
त्यामुळेच युवा काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सामन्य काँग्रेस कार्यकर्ता हा राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे अशी मागणी करत आहे. एकूण ही लढाई कशाची आहे व ती प्रामाणिकपणे लढण्याची जी आंतरिक इच्छाशक्ती लागते ती फक्त राहुल गांधींच्या मध्ये आहे हे संघाला भाजपला मोदी शहा यांना पक्क कळत.
जर राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवलं नाही तर आजपर्यंत त्यांच्या विरोधात करण्यात आलेली पप्पू मोहीम फत्ते झाली हेच सिद्ध होईल.
राहुल गांधींच्या अध्यक्ष न होण्याने सगळ्यात मोठा परिणाम होणार असेल तर हेच की हिंदुराष्ट्र निर्मितीचा मार्ग प्रशस्त होईल. हे रोखण्यासाठी राहुल गांधीच अध्यक्ष!
You can follow @imsurajmane.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: