अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर !
पृथ्वीराज कपूर हे नाटकांत व चित्रपटांमध्ये काम करायचे. त्यांचे तीनही मुलगे अभिनेता राज कपूर, ‘याहू’ स्टार शम्मी कपूर आणि यांच्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले.
पृथ्वीराज कपूर हे नाटकांत व चित्रपटांमध्ये काम करायचे. त्यांचे तीनही मुलगे अभिनेता राज कपूर, ‘याहू’ स्टार शम्मी कपूर आणि यांच्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले.
पृथ्वीराज कपूर हे हिंदी सिनेमा आणि भारतीय रंगमंच यांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. पृथ्वीराज यांनी मूकपटात आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली.
भारतीय जन नाट्य संघ (Indian People& #39;s Theatre Association-IPTA-इप्टा) याच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. पृथ्वीराजांनी १९४४ मध्ये मुंबईत पृथ्वी थिएटरची स्थापना केली. ह्या नाटक कंपनीची नाटके संपूर्ण देशभरात होत होती.
भारतीय सिनेमाक्षेत्रात पुढे नामांकित झालेल्या कपूर खानदानाची ही सुरुवात होती.
पृथ्वीराज यांनी त्यांच्या पेशावर पाकिस्तान मधील एडवर्ड कॉलेजमधून उच्च शिक्षण मिळाले. त्यांनी एक वर्षासाठी कायद्याचे शिक्षण घेतले ज्यानंतर ते थिएटर विश्वात गेले.
पृथ्वीराज यांनी त्यांच्या पेशावर पाकिस्तान मधील एडवर्ड कॉलेजमधून उच्च शिक्षण मिळाले. त्यांनी एक वर्षासाठी कायद्याचे शिक्षण घेतले ज्यानंतर ते थिएटर विश्वात गेले.
पृथ्वीराज कपूरने लयलपुर आणि पेशावरमधील थिएटर्समध्ये अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९२८ साली, मावशीकडून कर्ज घेऊन ते मुंबईत स्थायिक झाले. तेथे ते इंपीरियल फिल्म कंपनीत दाखल झाले. तेथे त्यांनी दो धारी तलवार, सिनेमा गर्ल, शेर-ए-अरब आणि प्रिन्स विजयकुमार ह्या चित्रपटांत अभिनय केला.
१९२९ मध्ये त्यांनी आपल्या तिसऱ्या सिनेमात प्रमुख भूमिका निभावली असली तरीही, पृथ्वीराज कपूर यांनी भारताच्या पहिल्या आलम आरा (१९३१) या बोलपटात एक सहाय्यक भूमिका निभावली होती. विद्यापती (१९३७) मधील त्यांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद होती.
सोह्रब मोदी यांच्या सिकंदर (१९४१) मधील अलेक्झांडर द ग्रेट म्हणून त्याचे काम कदाचित सर्वात चांगले आहे. इंग्रजी ग्रेट अँडरसन थिएटर कंपनीतही ते दाखल झाले व त्यासाठी ते मुंबईत एक वर्ष राहिले. या सर्व वर्षांत ते नाट्यसृष्टीशी सतत संबंधित राहिले आणि नियमितपणे रंगमंचावर भूमिका करत होते.
त्यांनी रंगमंच आणि सिनेमाचा पडदा या दोन्ही ठिकाणी एक बलदंड आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रतिष्ठा मिळवली.
पृथ्वीराज कपूर यांना १९६९ साली कला क्षेत्रात पद्मभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. १९७२ मध्ये त्यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला.
पृथ्वीराज कपूर यांना १९६९ साली कला क्षेत्रात पद्मभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. १९७२ मध्ये त्यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला.
अशा अष्टपैलू अभिनेत्याची आज पुण्यतीथी आहे.
(जन्म : ०३ नोव्हेंबर, १९०१)
- मल्हार @malhar4you
(अजून माहिती असल्यास लक्षात आणून द्यावी)
#मराठी #म #दिनविशेष
(जन्म : ०३ नोव्हेंबर, १९०१)
- मल्हार @malhar4you
(अजून माहिती असल्यास लक्षात आणून द्यावी)
#मराठी #म #दिनविशेष