"समझा कर भाई! "वो" लोग दंगा कर सकते है!"

फार फार पूर्वी पुण्यात खाजगी कॉट बेसिस हॉस्टेलवर रहायचो.

मेसमध्ये रात्रीचं जेवण सुरु होतं - टीव्हीवर भारत-पाकिस्तान मॅच सुरु होती.

भारत जिंकला. आम्ही सगळे लिमिटलेस खुश झालो. काही सिनियर मंडळींकडे बाईक्स होत्या +
त्यांची सेलिब्रेशनची चर्चा सुरु झाली - एकजण म्हणाला - बाहेर नको पडायला आता, पोलीस फिरताहेत सगळीकडे. "तणाव" नको म्हणून.

तणाव? भारतीय टीम जिंकली म्हणून?!

हे विचारल्यावर एक सिनियर उत्तरला..."समझा कर भाई! "वो" लोग दंगा कर सकते है!" +
भारतात

भारतीय टीम जिंकल्याचं सेलिब्रेशन केल्याने

तणाव निर्माण होऊ शकतो

म्हणून पोलिसांना रस्त्यावर गस्त घालत फिरावं लागतं...

आणि म्हणून तरुण पोरं सेलिब्रेशन करणं टाळतात...

कारण ""वो" लोग दंगा कर सकते है!" अशी भीती मनात असते...

हा प्रसंग तेव्हा मनावर कोरला गेला, तो कायमचाच. +
प्रत्येक "तो" काही पाकिस्तान प्रेमी नसतो. दंगलखोर नसतो. अतिरेकी तर नसतोच नसतो. पण तरी पोलिसांना रस्त्यावर उतरावं लागतं. तरी लोकांच्या मनात भीती पेरली जात असते.

हे "त्या" लोकांचं पाप नाही. हे सिस्टीमचं ग्रँड फेल्युअर आहे. +
असे बरे दंगे करतात राव "ते" लोक!

सिस्टीम काय आम्हालाच घरात बसवण्यासाठी आहे काय?

तो एक दिवस होता, आजचा एक दिवस आहे. फरक शून्य.

आज सकाळपासून भरपूर फोटो फिरताहेत सोशल मीडियावर. विविध बाजारांमध्ये झुंडी उरल्यात. सण साजरा करायला. +
आणि आपण गोग्गोड शानी शानी बाळं गप गुमान घरात बसलो आहोत.

आपल्याकडे घरात बसण्याशिवाय पर्याय नाही. ते योग्यच अन आवश्यकच आहे. पण या झुंडी रस्त्यावर उतरताहेत, त्यामुळे अख्खा देश पुन्हा एकदा त्याच विळख्यात अडकण्याची भीती आहे - +
आणि आम्ही घरात बसून, नियम पाळूनसुद्धा त्यात होरपळून निघणार आहोत - हे खोटं आहे का?

केंद्र काय, राज्य काय...कोणतंच सरकार हा प्रॉब्लम थेट अंगावर का घेत नाहीये?

"त्या" लोकांचं सोडा. एकूणच लॉकडाऊनचा खेळखंडोबा झालाय... निस्तरणार आहेत की नाही कधी? +
लॉक डाऊनच्या पहिल्या दिवसापासून हा विनोद बंद करा आणि जरा सिरीयस इम्पलिमेन्टेशन करा हे कितीतरी लोक सोशल मीडियावर सतत ओरडत आहेत. कोणत्याच पक्ष समर्थकाला, कार्यकर्त्याला हे आपापल्या नेत्यांना सांगावंसं वाटत नाहीये का? आरोग्य विषय राज्यांचा आहे - +
असं म्हणून केंद्र सरकार शक्तीनिशी उतरत नाहीये, आम्ही एकदम बेश्ट काम करतोय असं म्हणत राज्य सरकार निवांत आहे.

आम्ही मरतोय यात मधल्यामध्ये.

मोदी टीव्हीवर येऊन सांगतात "बिलकुल बाहर निकलना नहीं है" मग स्पष्टीकरण येतं की जीवनावश्यक वस्तू मिळत रहाणार! आपण वाटेल तेव्हा येत जा बाहेर! +
मग हळूच तुमच्या नाकाखाली तबलिगी जम्माडी जम्मत करतात.

मग देशभर धिंगाणा. ते लोक क्वारंटाईनमधून पळून काय जातात, थुंकतात काय...सर्कसच सुरु असते.

आणि आम्ही गोग्गोड शानी शानी बाळं गप गुमान घरात बसलेलो असतो. +
महिना झाला नोकरी व्यवसाय बंद करून घरात बसलोय आम्ही. अजून पुढचा महिना असाच जाणार हे स्पष्ट दिसतंय. लोक असेच मोकाट सुटले तर महिन्यानंतरसुद्धा परिस्थिती फारशी नियंत्रणात आलेली असेल असं वाटत नाही. मग बसवताच कशाला घरात? +
आपल्या एम्प्लॉईजचे पगार कापू नका असं आवाहन करून तुम्ही मोकळे. कुठून आणू पगार? पगार सोडा साहेब, आपापले स्टार्ट अप्स गुंडाळून घेणं सुरु पण केलं कित्येकांनी. माहितीये का तुम्हाला?

सुरुवातीला घरगड्यांना भरभरून मदत केली सर्वांनी. पण हा पेशन्स किती टिकणार आहे? कल्पना आहे का काही? +
जगभरात भारताचं कौतुक होतंय, देशभरात महाराष्ट्र दिशादर्शक ठरतोय हे सगळं फक्त बातम्यांतच दिसतंय.

वाट्टेल तेव्हा वाट्टेल तसं वागणाऱ्या झुंडी आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणारे आपण...बस इतकंच खरं, रस्त्यावरचं वास्तव आहे. +
मीनव्हाईल, "समझा कर भाई! "वो" लोग दंगा कर सकते है!" असं एकमेकांना सांगत, आणि आम्ही गोग्गोड शानी शानी बाळं गप गुमान घरात बसलेलो आहोत. +
केंद्र काय, राज्य काय, शासन काय, प्रशासन काय.

खमकी अॅक्शन घेणारं कुणीच नाही आपल्याकडे.

सामान्य भारतीय नागरिकच पोरका आहे आपल्याकडे.

: ओंकार दाभाडकर
[email protected]
@threadreaderapp unroll please
You can follow @OmkarDabhadkar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: