कॉमन मिनिमम प्रोग्रॅम मध्ये नसलेला सर्वात पहिला मुद्दा साहेबांनी काढला तो कोरेगाव भीमा चा !
कोरेगाव चा तपास नीट झाला नसून त्यात पोलिसांचा ही समावेश असावा असा पवार साहेबांनी सूर आळवला आणि सेनेला कचाटीत पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोदी साहेब मदतीला आले आणि NIA कडे तपास गेला
मुख्यमंत्र्यांनी त्यांचा विशेष अधिकार वापरून राष्ट्रवादी च्या गृहमंत्र्याला बगल दिली
त्यानंतर कोरोना च्या काळात या,
इथे पण साहेबांनी फेसबुक लाईव्ह घेऊन अनेक मागण्यांचे ओझे स्वतः सरकार मध्ये असून देखील मुख्यमंत्र्याच्या माथी मारले
मग पुढे वाधवांन प्रकरण झाले , राष्ट्रवादी च्या गृहमंत्र्यांनी सेनेच्या मुख्यमंत्र्याला तोंडावर पाडले !
मुख्यमंत्र्यांवर अशे प्रश्न उपस्थित झाले की ज्याची उत्तरे त्यांच्या कडे नव्हती
नंतर झाले बांद्रा येथील प्रकरण ! काँग्रेसच्या नेत्याने गर्दीला समबोधित केले ह्यातच काय ते आले !
पण पुन्हा प्रश्न उपस्थित झाले की
मुख्यमंत्री काय करत आहेत ?
आणि ह्यात आदित्य ने केंद्र सरकार वर आरोप करून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला
ह्या सगळ्या गोंधळात राष्ट्रवादी च्या मंत्र्याने धारकरी तरुणाला बंगल्यावर नेऊन मारल्याचा प्रकार समोर आला !
पण पुन्हा प्रश्न मुख्यमंत्र्यांवर आले !
लोकशाही च्या अंमलबजावणीची सर्वात मोठी जबाबदारी त्यांचीच आहे !
ह्यानंतर झाले पालघर प्रकरण ज्यात दोन साधूची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली ! गृहमंत्री नी हात वर केले आणि सगळा रोष सेनेच्या मुख्यमंत्र्या कडे गेला !
नंतर अर्णब ने ह्या प्रकरणावर विचारलेले प्रश्न सोनिया गांधी आणि त्यांच्या काँग्रेस ला झोंबले आणि त्यांनी सेनेच्या मुख्यमंत्र्यावर अर्णब च्या अटकेचा दबाव आणला !! ह्या आणि अश्या अनेक प्रकरणातून दिसून येतंय की सध्या फक्त कुरघोडीचे राजकारण सुरू आहे
सेनेला एक फक्त मुख्यमंत्रीपद ह्या खेरीज सत्तेत मोठा वाटा मिळाला नाही ,पण सेने वर जबाबदारी तर सगळी येऊन पडली आहे , राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वैराचार करत आहेत पण सेनेला स्वतःच आचरण जपायचे आहे
ज्या सेनेमुळे ह्यांना सत्ता मिळाली तिलाच ते सम्पवायला निघालेत की काय अशी शंका यावी इतपत राजकारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस खेळत आहेत ! हिंदुत्व ,मराठी माणूस ,बाळासाहेबांची पुण्याई , सावरकर प्रेम,ज्वलंत विचार ,असे एक एक असलेले विषेश गुण सेना हरवत जात आहे
कधींनाकधी निवडणुका लागतील , तेव्हा मतदारासमोर मत मागण्यांचे मुद्देच सेना हरवत जात आहे ! सगळ्या चांगल्या कामाचे श्रेय राष्ट्रवादी आणि काँग्रेस लाटणार असून वाईट कामाचे खापर सेनेवर फोडण्यात येईल
म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडा खाये फकीर अशी अवस्था सेनेची होणार आहे !
You can follow @khadaksingh_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: