अर्णब आणि राजीव चंद्रशेखर....भाजपाई माध्यम दलाल...

@rajuparulekar @ameytirodkar @sneha2986 @arvindgj @Harshsjadhav @anil010374 @gpekmaratha @Liberal_India1 @faijalkhantroll @__________anuja @Annu_kadle @prathameshpurud 👇
1 डिसेंम्बर 2017 ला द कारवान म्यागझीन मध्ये एक रिपोर्ताज प्रकाशित होतो.निकिता सक्सेना आणि अतुल देव या दोन शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या त्या रिपोर्ताजच नाव असत,"NO Lands Man"(Rajeev Chandrasekhar’s mission to secure power in media and politics) 👇
यातील राजीव चंद्रशेखर हे नाव अत्यंत महत्वाचं.तर कोण हे राजीव चंद्रशेखर? याबद्दल आपण थोडीशी माहिती घ्यायला हवी.गुगल केलं तर आपल्याला लगेच समजून येईल की,सदर गृहस्थ मोठे उद्योगपती असून त्यांचे अनेक मोठमोठे उद्योगधंदे आहेत.आपण BPL या कंपनीचे नाव ऐकले असेल? 👇
तर ही कंपनी याच माणसाची.आधी टीव्ही,फ्रीज सारखी उपकरण बनवायची.नंतर या कंपनीने 1995 मध्ये मोबाईल सेट बनवण्याचा आणि त्यासाठी लागणाऱ्या नेटवर्कचा धंदा सुरू केला.पण राजीव यांचं दुर्दैव अस की ते यात फेल गेले. 👇
पण या माणसाने तोवर भरपूर पैसे छापले होते.देशातील तो एक प्रतिथयश उद्योजक बनला होता. पुढे 2006 साली तो आपल्या पैश्यांच्या जिवावर राज्यसभा खासदार देखील बनला. 2014 साली जस देशात "मोदी सरकार"
सत्तेत आलं तस या माणसाला कॅबिनेट मंत्रीपदाची ची स्वप्न पडू लागली.आणि 👇
त्याने यासाठी जोरदार मोर्चेबांधणी देखील सुरू केली.परंतु तो पडला एक राज्यसभा खासदार.त्यात जनतेच त्याला काही विषेश अस पाठबळ नव्हतं.त्याच्याकडे जी काही asset होती,ती म्हणजे त्याची संपत्ती.राजीव खूप कमी वयात खूप सारा पैसा कमवणारा माणूस होता.हुशार होता,धोरणी होता. 👇
त्याच्या लक्षात एक जबरदस्त गोष्ट आली होती.ती म्हणजे "मीडिया इन्व्हेस्टमेंट".ही फिल्ड भरपूर पैसे देणारी तर होतीच शिवाय त्याच उपद्रव मूल्य वाढवणारी देखील होती.ज्याचा येणाऱ्या काळात आपल्याला मजबूत फायदा होईल,हे या माणसाने ओळखले होते.आणि
👇
यासाठी मग त्याने सुरवातीला अनेक मीडिया हाऊसेस सोबत बोलणं देखील सुरू केलं होत.
त्याच दरम्यान म्हणजे 2016-17 ला एक गोष्ट भारतीय माध्यमात घडत होती.टाइम्स नाऊ या लोकप्रिय न्यूज चॅनेल चा तत्कालीन संपादक अर्णब गोस्वामी याने राजीनामा दिला होता.👇
आणि तो आता एका अश्या इन्व्हेस्टर च्या शोधात होता,जो त्याच्यासाठी,त्याच्या फेमसाठी एक वृत्तवाहिनी उभी करण्यासाठी,त्याच्यासोबत मिळून मजबूत पैसा लावेल.
इथं राजीव चा शोध अर्णबजवळ येऊन तर अर्णब चा शोध राजीवजवळ येऊन संपतो.नवीन न्यूज चॅनेल काढण्यासाठी दोघे एकत्र येतात.👇
आणि Republic ची स्थापना होते.
यासाठी लागणारी गुंतवणूक AGR Outliner Media Private Limited, या अर्णब आणि राजीव चंद्रशेखर च्या नव्या कंपनीच्या अंतर्गत करण्यात येते.या चॅनेलसाठी अर्णब स्वतःच्या आणि बायकोच्या मालकीचे मिळून तब्बल 26 कोटी रुपये चॅनेल मध्ये गुंतवतो.👇
तर राजीव चंद्रशेखर हे 30 कोटी रुपयांची गुंतवणूक करतात.राजीव चंद्रशेखर यांची ही गुंतवणूक ते त्यांच्याच मालकीच्या,"ज्युपिटर कॅपिटल" नामक कंपनीच्या माध्यमातून करतात.
इथून थोडं आता आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात.
अर्णब च्या सोबत Republic बनवायच्या आधी, 👇
राजीव चंद्रशेखर हा 2014 बीजेपी मध्ये प्रवेश करतो.2014 च्या लोकसभा इलेक्शन मध्ये तो तिरुअनंतपुरंम येथून भाजपाकडून खासदारकीच्या तिकिटासाठी इच्छुक असतो.पण त्यावेळी त्याला डावलन्यात येते.त्यानंतर त्याला केरळच्या भाजपा युतीचा उपाध्यक्ष बनवला जातो.👇
सोबतच त्याला संसदेच्या डिफेन्स कमिटीचा देखील मेम्बर बनवण्यात येत.(याबद्दल आपण पुढे वाचणार आहोतच) 2014 ला डावलन्यात आल्याचा राग/असूया/अपमान त्याच्या डोक्यात असतेच.आणि तो 2019 वर तिरुअनंतपुरंम येथून तिकीट मिळावे याकडे लक्ष केंद्रित करतो. 👇
बाय द वे,तिरुअनंतपुरम येथून काँगेसकडून सिट लढवत असतात ते श्री.शशी थरूर साहेब..!
पूढे चालून 6 मे 2017 ला रिपब्लिक हे न्यूज चॅनेल सुरू होते.आणि पहिल्या तीन दिवसातच अर्णब भयंकर राडा घालून चॅनेल चा TRP वाढवण्यात यशस्वी होतो.पण इथं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे.👇
ती म्हणजे या तीन दिवसांचे ते विषय,जे अर्णब ने डिबेतसाठी निवडलेले असतात.
पहिल्या दिवशी - लालूप्रसाद यादव आणि शहाबुद्दीन यांच्या तथाकथित फोन संभाषनाची स्टोरी ब्रेक केली जाते. 👇
दुसऱ्या दिवशी - आम आदमी पार्टीच्या कपिल मिश्राला लॉन्च केले जाते,जो आपचे तत्कालीन आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर 2 करोड रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावून पक्षातून बाहेर पडतो.👇
तिसऱ्या दिवशी - कारण नसताना अर्णब शशी थरूर आणि त्यांची दिवंगत बायको सुनंदा पुष्कर चा मुद्दा घेऊन अतिशय तावातावाने डिबेटला बसतो.
आता आलं का लक्षात..? अर्णब ने कारणाशिवाय शशी थरूर यांचं जून प्रकरण बाहेर का काढलं होत..? 👇
तर त्याचा बिझनेस पार्टनर राजीव चंद्रशेखर साठी तिरुअनंतपुरंम येथे निवडणुकीची जमीन तयार व्हावी,त्याची लढाई सुकर व्हावी म्हणून..!
दरम्यान 2014 मध्ये ज्यावेळी राजीव चंद्रशेखर ने भाजपात प्रवेश केलेला असतो,अर्णब ने तेथील प्रादेशिक पक्ष CPM ला देखील टार्गेट केलं. 👇
CPM चे कार्यकर्ते हे संघाच्या लोकांचे मुडदे पाडतायत,असे आरोप करत त्याने अनेक चर्चा त्याकाळात घडवून आणल्या होत्या.शशी थरूर आणि CPM यांना बदनाम करण्याचा हा डाव होता.यात पत्रकारिता तर नावाला नव्हती...पण पत्रकारितेच बुरखा पांघरून, 👇
या पवित्र पेश्याचा फायदा घेऊन हा माणूस आपल्या चॅनेल इन्व्हेस्टर साठी तिरुअनंतपुरंम ची लढाई सोपी करायचा प्रयत्न करत होता..!

जस वर सांगितलं त्याप्रमाणे,2014 मध्ये राजीव हे संसदेच्या डिफेन्स कमिटीचा मेम्बर देखील झालेले आहेत.. 👇
या कमिटीचे काम हे,"सरकारतर्फे डिफेन्ससंदर्भात होणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे",हे आहे.
2016 साली मोदी सरकार, हवाई दलातील विमानांसाठी,"Aircraft Recognition Trainig System", खरेदी करण्यासाठी निविदा मागवते. आणि हे काँट्रॅक्ट, 👇
"Axicades Aerospace &Technologies", या कंपनीला देण्यात येत.यानंतर ही या कंपनीला अनेक असे काँट्रॅक्टस देण्यात आले.
आता, "यात चुकीचं काय आहे?", असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.डिफेन्स चे जे अनेक कॉन्ट्रॅक्ट राजीव चंद्रशेखर हा डिफेन्स कमिटीचा मेम्बर असताना, 👇
"Axicade Aerospace and Technologies" या कंपनीला देण्यात आले,त्या कंपनीमध्ये 75% शेअर्स कोणाचे आहेत?हे आपणास माहितीय?हे 75% शेअर्स आहेत,राजीव चंद्रशेखरच्या ज्युपिटर कॅपिटलचे. त्याच ज्युपिटर कॅपिटल चे,ज्या कंपनीने अर्णब सोबत,रिपब्लिक या न्यूज चॅनेल मध्ये देखील गुंतवणूक केलेली आहे
धक्का बसला..? याहून धक्कादायक बाब अशी आहे की,राजीव चंद्रशेखर हा माणूस संसदेच्या डिफेन्स कमिटीत बसून,स्वतःच्याच मालकीच्या एका कंपनीला,दुसऱ्या कंपनीच्या माध्यमातून काँट्रॅक्टस वर काँट्रॅक्टस मिळवून देत होता.थोडक्यात ज्यांच्यावर डिफेन्समधील व्यवहारावर लक्ष ठेवण्याच काम दिलं आहे, 👇
ते काँट्रॅक्टस वाटण्याचं काम दिलं आहे,तोच माणूस या जबाबदारीचा गैरफायदा घेत,स्वतःच्याच कंपनीला फायदा करून देत होता.हा किती मोठा भ्रष्टाचार आहे..? पण यावर कोणीच कधीच बोललं नाही.बोललं फक्त,"द वायर" आणि यानंतरच आता वायरवर राजीव चंद्रशेखर यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.👇
इंटरेस्टिंग म्हणजे,देशाला सदैव राष्ट्रभक्ती,देशप्रेम,निष्ठा यांचा डोस देणारा अर्णब देखील इथं चिडीचूप गप्प बसलाय.कारण त्याला मिळणाऱ्या प्रचंड पैश्यांपुढे वरच्या सगळ्या गोष्टी या कस्पटासमान आहेत.अर्णब हा एक पाळलेले जनावर आहे.त्यापुढे त्याची लायकी नाही.👇
आज अर्णब ची रिपब्लिकमध्ये असणारी मालकी ही,
राजीव पेक्षा जास्ती झाली आहे.थोडक्यात त्याचे शेअर्स हे राजीव पेक्षा जास्ती आहेत.तरीदेखील अर्णब राजीव किंवा भाजपच्या विरोधात भुंकू शकत नाही,बोलू शकत नाही.कारण भाजपा आणि त्यांच्या समर्थकांची आज असणारी बेफाम ताकदीचा त्याला पूर्ण अंदाज आहे.
छोटस अजून एक किस्सा सांगून हा लेख संपवतो,
माया कोडणानी च्या केससंदर्भात अमित शाह गुजरात हायकोर्टात हाजीर होणार होते.अर्णब टिव्हीवर लाईव्ह होता. टीव्हीच्या स्क्रीनवर खाली एक पट्टी पळत असते.टिकर म्हणतात त्याला. तर या टिकरवर बातमी फ्लॅश करण्यासाठी एक नेमलेला खास माणूस असतो.👇
त्या माणसाने ही बातमी त्या टिकर लाईनवर टाकली,हेडलाईन म्हणून.टीव्हीवर काय येणार? काय नाही येणार..? यावर लक्ष ठेवायला एडोटरीयल डेस्क हेड म्हणून काम बघत असणारे निरंजन नारायणस्वामी यांनी ती बातमी बघितली.आणि लगेच त्याच्यावर ओरडत त्यांनी ती बातमी,त्या कर्मचाऱ्यांला काढायला लावली..!👇
कारण....मालकाच्या विरोधात द्रोह करायचा नसतो,हे अर्णब,आणि त्याच्या कुत्र्यांना व्यवस्थित माहिती आहे.म्हणूनच अमित शाह किंवा मोदी हे नाव आलं की सपशेल लोटांगण घालणारा अर्णब...सोनिया,राहुल,पवार ही नाव आली की पेटून उठतो..!
तुम्हाला आता इथं किमान दोन प्रश्न पडले पाहिजेत अस मला वाटत.
1.
मोदी राजीव चंद्रशेखर ला डिफेन्स कमिटी चा मेंबर का बनवलं..?
2. राजीव चंद्रशेखरने अर्णबच्या चॅनेल मध्ये पैसे का गुंतवले..?

बाकी मराठीत साटलोट नावाचा एक भारी शब्द आहे..!

- मोहसीन.
@prash_dhumal @praveengavit10 @PriyadarshiniD3 @PriaINC @salonisharma767 @The_Realist808 👆👆
You can follow @ShubhamJatalNcp.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: