उद्धव ठाकरे आपले डोके ठिकाणावर आहे का ?

पद्धतशीर घडवून आणलेल्या नृशंस, पाशवी हत्याकांडाला तुम्ही गैरसमजातून घडलेली हत्या कशी काय म्हणू शकता ?
तेही इतक्या थंडपणे ? तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या आवाजात जरासुद्धा खेद नसावा .जरासुद्धा दुःख नसावे..
लाज वाटते आहे आज महाराष्ट्राला या
सरकारची.

ही खुर्चीची लाचारी नक्कीच नाही तुमची .. हे तुमचे भयानक रूप दिसू लागले आहे.
काल जनतेच्या रेट्यामुळे 3 दिवसानंतर तुम्ही या विषयावर बोलला खरे पण ज्या पध्दतीने बोललात ते बघून खात्री पटली की इथून पुढे भगव्याने त्याच्या सन्मानासाठी आणि
हिंदूने त्याच्या रक्तासाठी तुमच्यावर विश्वास ठेवू नये .

अनादी अनंत काळापासून वंदनीय असलेल्या भगव्याचे...
छत्रपती शिवरायांनी ... छत्रपती संभाजीराजांनी.... आणि असंख्य नर वीरांनी ज्याच्यासाठी आपल्या उभ्या आयुष्याची होळी केली त्या भगव्याचे,
स्व. बाळासाहेबांनी ज्याच्यासाठी त्यांच्या आयुष्याचा भंडारा मांडला त्या भगव्याचे रक्त तुमच्या तोंडाला लागले आहे हे लक्षात असूद्या.

कालपासून डोके सुन्न झाले आहे देशाचे. डोळ्यातील अश्रू आटलेत. घटना १६ तारखेला रात्री घडली आणि घटनेचा सुनियोजित व्हिडिओ काल २० तारखेला
सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर उभ्या मानवजातीच्या अंगावर शहारे आलेत ..

इतक्या पाशवी पध्द्तीने हत्या केली आहे की मुर्दाड मन सुद्धा भयंकर संतापाने पेटून उठले आहे .

जो व्हिडीओ सगळ्या जनतेने पहिला तो तुम्ही पहिला नसेल असे शक्य नाही आणि म्हणून ही घटना एक अपघात होता
ह्या तुमच्या म्हणण्यावर
शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही .

तुम्ही तुमच्या नेहमीच्या शैली मध्ये तिथे खूप अंधार होता ..काहीच दिसत नव्हते वगेरे सामान्य माणसाला सहज पटेल असे बोललात खरे पण व्हिडिओ जेव्हढा स्पष्ट दिसतोय त्यावरून तुमच्या म्हणण्याला फारसा अर्थ उरत नाही साहेब.
एक ७० वर्षाचा असहाय वृद्ध साधू आयुष्याची भिक मागतोय आणि तो हरामखोर पोलिस त्या भगव्या वस्त्रधारी सन्याशाला निर्दयीपणे कोयते आणि काठ्या घेतलेल्या शंभर सव्वाशे नराधमांच्या हवाली करून लांब पळतोय हे दृश्य फक्त पोलिस खात्यालाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे.
रक्त उकळते आहे संतापाने महाराष्ट्राचे..

सद रक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीदवाक्याची यापेक्षा जास्त क्रूर चेष्टा नाही बघितली कुणी .

भारतीय घटना सामान्य नागरिकाला सुद्धा स्वतः चा जीव वाचवण्यासाठी प्रसंगी हत्या करण्याची मुभा देते..हे त्या क्रूर पोलिसाला माहीत नव्हते काय ?
त्याने उलट हल्ला का केला नाही ?
त्याच्याकडे मुद्दाम हत्यार दिले नव्हते की वापरायची मुभा नव्हती ?

त्याने त्या साधुंना वनखात्याच्या इमारती मधून कुणाच्या सांगण्यावरून बाहेर आणले ..?
बाहेरचा जमाव हिंस्त्र झाला आहे हे त्याला माहीत नव्हते का ?
( इमारतीमध्ये नेण्या अगोदर सुद्धा त्या साधुंना मारहाण झाली होती हे त्या साधूच्या फुटलेल्या डोक्यावरून सहज दिसत होते )

तरीही कुणाच्या सांगण्यावरून त्या निरपराध जीवांना त्याने त्या हिंस्र कोल्हयांच्या हवाली केले ?
आणि त्यांच्या अशक्त देहाचे मारून मारून तोडलेले लचके तो बघत बसला ?
कुणाच्या सांगण्यावरून त्या दोन साधूंचे मृतदेह जनवरासारखे टेम्पो मध्ये भरून आणले ?

कुणाच्या सांगण्यावरून इंडियन एक्सप्रेस सारख्या दैनिकाने तीन चोरांची जमावाकडून हत्या असे छापले .
ज्या १०१ का ११० लोकांना अटक केल्याचे तुम्ही सांगत आहात..त्यांच्या चौकशी मध्ये तुम्ही वरील
प्रश्नांची उत्तरे शोधण्याची हिम्मत दाखवणार का?

एव्हढेच काय अटक केलेल्या त्या जनावरांची नावे का जाहीर करत नाही सरकार?
तुम्ही ज्यांच्या दावणीला बांधून घेतले आहे ते उघडे पडतील म्हणून ?
कुणाची दाढी कुरवाळत आहात ठाकरे सरकार ?

दररोज येवून जनतेशी संवाद साधताना,
तुम्हाला ह्या घटनेची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला का द्यावीशी वाटली नाही ?

हत्याकांड घडले ते गाव आणि परिसर नक्षली आणि साम्यवादी लोकांचा प्रभावशाली परिसर आहे हे तुम्हाला माहीत नाही ?
का केरळ मध्ये दरवर्षी अनेक हिंदूंना याच प्रकारे मारले जाते याचा तुम्हाला विसर पडला ?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मागतोय आज आक्रोश करणारा महाराष्ट्र ..

कोरोना मधून वाचवुन इस्लामिक अथवा नक्षली दहशतवाद्यांच्या हातून मरण्यासाठी सोडणार असाल तर लक्षात असूद्या महाराष्ट्राच्या मनगटात आणि छातीत अजूनही स्वतःचे रक्षण करण्याची धमक आहे .
ही बातमी किरकोळ घटना दाखवून दाबून टाकायचा बेत अंगावर उलटला आहे तुमच्या.

त्याचबरोबर ज्याने कुणी तो व्हिडिओ बनवला आणि viral केला त्याचे संभाव्य connection तुमच्या लक्षात येवू नये याचे ही आश्चर्य वाटले.

एव्हढ्या मोठ्या घटनेचा इतका स्पष्ट व्हिडिओ एवढ्या जवळून कोण बनवू शकेल.. ?
तो viral करून कुणाला फायदा होणार होता . ? असा व्यवस्थित विडिओ बनणे आणि तो 3 दिवसानंतर viral होणे यामागे काहीतरी वेगळेच षडयंत्र असू शकते हे तुमच्या लक्षात येऊ नये ?

का तुम्हाला हे सगळे माहीत आहे पण तुमची वाघाची कातडी ६ महिन्यात गेंड्याची झाली आहे ?
का तुम्हीसुद्धा मोठमोठे गेम खेळायला सुरुवात केलीय ?

कळू द्या एकदाचे आम्हाला.

सन्यासी होणे म्हणजे काय असते हे बहुतेक तुम्हाला माहीत नाही ..
लाख लोक मरतात तेव्हा एक सन्यासी जन्म घेतो.
आपलं आयुष्य समाजासाठी अर्पण केलेल्या त्या ७० वर्षीय वृद्ध आणि ३५ वर्षीय निशस्त्र असहाय
साधूंचा आणि त्या बिचाऱ्या ड्रायव्हर चा तळतळाट तुम्हाला नको असेल तर जागे व्हा ..

अजूनही वेळ गेली नाही.

ह्या नरसंहराची पाळेमुळे खणून काढा अन् तसा विश्वास महाराष्ट्राला द्या .

हिंदूंवर डोळे वटारणारया गिधाडांवर जरब बसवा
अन्यथा अशा गिधाडांचे डोळे काढण्याची धमक अन षंढ सरकारला घरी बसवण्याची ताकत महाराष्ट्रात आहे.

अविनाश देशमुख
@threader_app unroll please. Thanks in advance
You can follow @yayati_king.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: