"शास्त्री सोमवार ते मोदी दिवाळी" - प्रवास राष्ट्रीय एकात्मतेचा... (थ्रेड)

१९६१ मध्ये भारत चीन युद्धानंतर भारताची आर्थिक घडी बिघडली होती.

पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर १९६४ मध्ये देशाची धुरा लालबहाद्दूर शास्त्रींकडे आली होती. त्यातच ओढवलेला भीषण दुष्काळ...
आणि १९६५ मध्ये भारत - पाक युद्ध चालू झाले. भारतीय सैन्याने पाक सैन्याला नामोहरम करून सोडलं. सैन्याची होत असलेली पीछेहाट पाहून पाक सरकारने अमेरिकेकडे मदत मागितली.

अमेरिकेने सांगितलं, जर भारताने युद्ध बंद नाही केलं तर भारताला होणारा गव्हाचा पुरवठा थांबवला जाईल.
शास्त्रीजींनी अमेरिकेच्या या धमकीला न जुमानता सर्व भारतीयांना आवाहन केले "ह्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आठवड्यातून केवळ एक दिवस उपवास करा....!!"

आणि बघता बघता सर्व देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला. उपवासाचा सोमवारचा दिवस "शास्त्री सोमवार" म्हणवला जाऊ लागला...
आज शास्त्रीजी आपल्यात नाहीत..!
पण देश मात्र तोच आहे...!!

संकटाच्या काळात देश एकत्र यावा म्हणून त्यावेळी देशाचे पंतप्रधान असणाऱ्या शास्त्रीजींनी एक आवाहन केलं होत आणि यावेळी मोदींजींनी...
विषय कोण नेता आहे, कुठल्या पक्षाचं सरकार आहे हा नाही, तर आपण एक होऊन लढू शकतो हे दाखवण्याचा आहे...

"शास्त्री सोमवार" साजरा करायला आपण नव्हतो, पण "मोदी दिवाळी" मात्र साजरी करायला होतो.

या मोदी दिवाळीने आपल्यातील राष्ट्रीय एकात्मतेची भावना अजून दृढ केली यात तीळमात्र शंका नाही...
You can follow @That_Pune_Guy2.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: