#कार्य_शिवसेनेचे

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, शिवसेनापक्षप्रमुख आणि दिवाकर रावते...!

काय आहे हा इतिहास आणि का साजरा होतो हा 17 सप्टेंबर चा सोहळा. चला जाणून घेऊ या...! {1/1}
#म
#मराठी
#अखंडमहाराष्ट्र
#मराठवाडामुक्तीसंग्रामदिन
#मराठवाडा
@DRaote
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण मराठवाडा पारतंत्र्यातच होता. १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी मराठवाडा स्वतंत्र झाला, पण मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामाला स्वातंत्र्याचा लढा म्हणून अधिकृत मान्यता दिली नाही. {1/2}
#मराठी
#म
१९९५ पर्यंत मराठवाड्यात १७ सप्टेंबर या दिवशी शासकीय पातळीवर झेंडावंदन होत नव्हते!

हैदराबाद संस्थान हे भौगोलिक दृष्टीने भारताच्या मध्यभागी असलेले भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबाद संस्थानाची व्याप्ती १६ जिल्ह्यांची होती. हे १६ जिल्हे चार सुभ्यांमध्ये विभागले गेले होते.
तेलगू भाषिकांचे दोन सुभे, कानडी भाषिकांचा एक सुभा व मराठी भाषिकांचा एक सुभा होता. मराठी भाषिकांच्या सुभ्याला मराठवाडा हे नाव होते. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व मराठवाड्याने केले व या संग्रामात सर्वात जास्त हुतात्मे मराठवाड्यातील होते.
{1/4}
भाषावार प्रांतरचनेचा आग्रही पुरस्कार करणारा मराठवाडा नेहमीच अखंड महाराष्ट्रवादी राहिला. पण मराठवाड्याच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली. १९९५ साली महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिवसेना -भाजप सरकारने शासकीय पातळीवर झेंडावंदनाचा निर्णय घेतला !
{1/5}
दिवाकरजी रावते मराठवाड्यात त्यापूर्वी बरीच वर्षे काम करत असल्यामुळे त्यांना मराठवाड्यातील जनतेच्या भावना कळत होत्या. त्यांनी या भावना उद्धवजींच्या कानावर घातल्या उद्धवजी व दिवाकरजी रावते मा.शिवसेनाप्रमुखांशी बोलले.
{1/6}
मराठवाड्यातील जनतेच्या भावना शिवसेना प्रमुखांच्या कानावर घातल्या मराठवाड्यात १७ सप्टेंबर या दिवशी शासकीय पातळीवरुन झेंडावंदन झालेच पाहिजे व हुतात्म्यांची स्मृती जतन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हुतात्मा-स्मृतीस्तंभाची उभारणी झालीच पाहिजे' असा हट्ट धरला.
{1/7}
#शिवसेनाप्रमुखच ते...मनाला पटलेल्या विचारांची अंमलबजावणी करण्याबद्दल तर त्यांची ख्याती होती! त्यानी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना आदेश दिले-मराठवाड्याचा स्वातंत्र्यदिन शासकीय पातळीवर साजरा झाला पाहिजे...आणि मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात हुतात्म्यांचे स्मृतीस्तंभ उभे करा....!'
{1/8}
सरकारने निर्णय घेतला.. पहिला #स्मृतिस्तंभ #नांदेड येथे उभारला गेला , 17 सप्टेंबर 1998 रोजी... तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मंत्री #दिवाकर_रावते यांच्या तसेच #मराठवाड्यातील प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांच्य उपस्थितीत..प्रशासन हलले..
{1/9}
आणि महाराष्ट्रातील सेना भाजप सरकारने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले ! शिवसेनेने मराठवाड्याच्या अस्मितेला केलेले ते अभिवादन होते मराठवाड्यात उभारलेले स्मृतीस्तंभ रावते साहेबांच्या कल्पकतेतून साकार झाले वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी स्मृतीस्तंभाची प्रतिकृती तयार केली
#मराठवाडा नेहमीच अखंड #महाराष्ट्रवादी राहिला. #शिवसेनेचीही भूमिका नेहमी अखंड महाराष्ट्रवादीच राहिली आहे. अखंड महाराष्ट्र ही #शिवसेना#मराठवाडा यांची समान वैचारिक भूमिका आहे!{1/11}
#म
#मराठी
#मराठवाडामुक्तीसंग्रामदिन
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २५ वर्षांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला स्वातंत्र्यलढा म्हणून मान्यता मिळावी हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे! जगातील स्वातंत्र्याच्या लढ्यात जागतिक विक्रमी दुर्दैव मराठवाड्याच्या वाट्याला आले !! {1/12}
#मराठी
#मराठवाडामुक्तीसंग्रामदिन
#म
१७ सप्टेंबर हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यासाठी अजून २४ वर्षे जावी लागली. म्हणजे मराठवाड्याच्या स्वातंत्र्यदिनाला शासकीय पातळीवरुन मानवंदना स्वातंत्र्यानंतर ४९ वर्षांनी मिळाली. आणि हे ज्याच्या पुढाकारामुळे घडले त्यांचे नाव #दिवाकर_नारायणराव_रावते..! {1/13}
#मराठी
#म
आणि हे ज्या पक्षाच्यातुन सरकारने केले त्याचे नाव #शिवसेना !!

मराठवाड्याच्या #अस्मितेला #विनम्र #अभिवादन..!
{1/14}
@BabajiRinge2
@vaibhavivchavan
@mayurvsk
@threadreaderapp unroll please
You can follow @TheAmitBodkhe.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: